प्रतिनिधी :सुरेश बोरले
महाराष्ट्र,बीड येथे अतिशय अप्रिय घटना घडली आहे.जनक्रांती पक्षाचे नेते हे बीड येथे , शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात! आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत.एकंदरीत 700 गाड्यांचा संच त्यांच्या सोबत बीड कडे निघाला होता . तत्पूर्वी नेत्यांनी, शहरातील “छत्रपती शिवाजी महाराजांच्या” अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना,त्यांनी आपली स्वतःची पादत्रणे न काढता पुष्पहार अर्पण केलेल्याची माहिती आहे.”छत्रपती शिवाजी महाराज” हे महाराष्ट्र चे दैवत आहेत त्यांचा अपमान जनता सहन करणार नाही.आपल्यापेक्षा आम्हाला आमच दैवत प्रिय आहे.यापुढे नेत्यांनी! राष्ट्र पुरुषांना! पुष्पमाला अर्पण करताना, पादत्राणे काढण्याचे भान ठेवावें व नंतरच पुष्पमाला पुतळ्यात अर्पण करावी.मगच त्यांचा सन्मान करावा, ही जनतेची मागणी.